नमस्कार... कसे आहात तुम्ही? हा लेख खास मी अशा लोकांसाठी लिहिणार आहे ज्यांच्या तोंडात एकही दात नाही. जे हिरडीचा वापर करून जेवतात त्यांना नाही पण ज्यांना पहीलेसारखं दाताने अन्न बारीक करून खायचं आहे त्यांच्यासाठी हा लेख खूप सारी माहिती देऊन जाणार आहे.
बऱ्याच पेशंट ना दात काढून टाकायची खूप घाई असते. दात दुखला की टाका काढून... आणि तोंडातले बरेच दात काढून टाकले की जेवायची पंचाईत होते. मग उरलेले सगळे दात काढून कवळी लावायची पण घाई.. काहींचे वयोमानानुसार दात पडतात आणि जेवण कमी जात असल्याने तब्येत पण ढासळते. काहीच्या हीरडीचा त्रास असल्याने दात लवकर पडतात. अश्या काही न काही कारणाने तोंडात एकही दात रहात नाही. मग चपाती भाकर खाणे खूप मुश्किल काम होते आणि कवळी बनऊया असा विचार मनात डोकवायला लागतो. काही प्रश्न जे कवळी बसवताना पेशंट नेहमी विचारतात त्यातल्या काहींची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी इथे केला आहे.
हिरडीने खाता येत असेल तरी कवळी बनवावी का?
हो. हिरडीने खाताना आपण त्यांचा दातासारखा वापर करतो. त्यामुळे त्या एकमेकांवर घासल्या जाऊन कमी होऊ लागतात. मग हिरडीने देखील खाता येत नाही. त्यावेळेस मात्र जबड्याचं हाड कमी झाल्याने कवळी बसवायला त्रास होतो. म्हणून सुरुवातीला जरी हिरडीने खाता येत असेल तरी सगळे दात पडल्यावर किंवा काढून टाकल्यावर लगेचच कवळी बसवावी.
कवळी बसावल्यावर मला लगेच खाता येईल का?
कवळी हातात मिळाल्यावर लगेच दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला सगळं काही खाता येईल अशी खोटी आशा मी इथे तुम्हाला देऊ इच्छित नाही. कवळी मिळाल्यावर बऱ्याच दिवसानंतर तोंडात सगळेच्या सगळे दात एकदम येतात. त्यामुळे कवळीला तोंडात अॅडजस्ट व्हायला थोडे दिवस द्यावे लागतात. कवळीची सवय झाल्यानंतर मात्र तुम्ही कवळी वापरून व्यवस्थित जेऊ शकतात.
आज हिरडीचं माप देऊन गेलो की लगेच उद्या कवळी मिळेल का?
कवळी बनवताना पाच प्रकारचे वेगवेगळे माप घ्यावे लागतात. लवकरात लवकर कवळी देण्याचा प्रयत्न प्रत्येक डॉक्टर करतो. पण हे शक्य होईल च असं नाही. म्हणून पेशंट ने थोडा धीर ठेवणे गरजेचे आहे.
कवळी तोंडातून कधीच नाही काढली तरी चालते का?
कवळी ही रोज रात्री काढून स्वच्छ करून पाण्यात ठेवावी. पूर्ण दिवस हिरडी कवळी च्या खाली दाबलेली राहते. तिला आराम मिळणे पण गरजेचे आहे. कवळी काढून हिरडीला बोटाने मालिश केल्यास हिरडी पण चांगली राहील.
कवळी काढून बाहेरच ठेवली तर चालेल का?
कवळी काढून पाण्यातच ठेवावी. कवळी बाहेर ठेवल्यास त्यामध्ये थोडेफार बदल होण्याची शक्यता असते. तसे होऊ नये म्हणून कवळी कधीही बाहेर ठेऊ नये. नेहमी पाण्यात ठेवावी.
कवळी काढ - घाल करायचीच असते का? फिक्स कवळी नाही बनऊन मिळणार का?
हो. कवळी फिक्स पण करता येते. पण ती फिक्स करण्यासाठी जबड्या मध्ये इम्प्लान्ट टाकला जातो. अश्या कवळी ला इम्प्लान्ट सपोर्टेड ओवरडेंचर असं म्हणतात.
पेशंट च्या हिरडी च हाड खूप कमी असल्यास अश्या पद्धतीचा वापर केला जातो. या प्रकार कवळीचा खूप कमी त्रास पेशंट ला होतो.
हे थोडेफार प्रश्न जे पेशंट कडून नेहेमी विचारले जातात. याशिवाय काही प्रश्न विचारायचे असल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा.
मस्त खा आणि स्वस्थ रहा.
डॉ. स्मितल नितीन पवार
उज्ज्वल दातांचा दवाखाना
नाशिक
मला फेसबुक वर फॉलो करा Facebook
https://www.facebook.com/Dr-Smital-Nitin-Pawar-Ujjwal-Dental-Clinic-114093043684175/
मला Linkedin वर फॉलो करा. linkedin
https://www.linkedin.com/in/dr-smital-pawar-3344b61b1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter irrelevant comment.